If you have not committed any mistake yourself, you can forgive others immediately; if you cannot forget or forgive be sure you have committed a mistake yourself. It is your own mind which keeps on pricking you and prevents you from forgetting and forgiving -- Kusumeshwaree


Article

ध्यानमूलं गुरोर्मूर्तिः
पूजामूलं गुरोः पदम् ।
ध्यानमूलं गुरोर्मूर्तिः,
पूजामूलं गुरोः पदम् ।
मंत्रमूलं गुरोर्वाक्यं,
मोक्षमूलं गुरोः कृपा ।। ७६ ।।


ध्यानाचे आधारस्थान गुरुमूर्ति होय. पूजेचे मूलस्थान गुरुचरण, मंत्राचे उगमस्थान गुरुवाक्य, मोक्षाचा मूलाधार गुरूची कृपा होय. साधक आध्यात्मिक मार्गाला लागला की त्याला प्रश्न पडतो, कोणाचे ध्यान करावे, कोणाची पूजा करावी. कोणता मंत्र जपावा व मोक्षापर्यंत कसे जावे. ह्या साऱ्या प्रश्नांची उत्तरे हा एक श्लोक देत आहे. सगुण भक्ति सुलभ व दीर्घकाल साधली की तिची परिणती निर्गुणांत होतेच, त्यांतही गुरूमूर्तीचे ध्यान सर्वांत अति सुलभ. गुरूला व्यक्ति म्हणून आपण पाहिलेले असते, गुरू इंद्रियगोचर असतो, त्यामुळे मनाला गुरुठायी एकचित्त होणे कठीण पडत नाही. पुन्हा गुरू हा देवाधिदेव, महादेव असतो. एका गुरुमूर्तीध्यानांत इतर साऱ्या देवदेवतांची आराधना आपोआपच होते. ध्यान करायचे ते गुरुमूर्तीवरच करावे. गुरुचरणपूजनांत साऱ्या प्रकारच्या पूजा अंतर्भूत होतात. मुळाला पाणी घातले की शाखापल्लव आदि सर्वांना पाणी मिळते, तद्वत् गुरुभक्तीने सर्व प्रकारची साधना आपोआपच होते. वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत. कारण गुरू हेच सर्व साधनांचें मूळ व फळ असतें. गुरू हेच साध्य. गुरू हेच साधनही. साध्य, साधना, साधक ही त्रिपुटी गुरूमध्ये एक होते. अद्वैतापर्यंत जाण्याचा अति जवळचा व लांब नसलेला मार्ग म्हणजे गुरुभक्ति होय, यांत मुळीच संदेह नाही. गुरुवाक्य मंत्रवत् असते. गुरुवचनांवर मनन केल्याने साधकाचा मंत्र, जप झाल्यासारखेच होते. गुरुमुखांतून निघणारे बोल परतत्त्वाला स्पर्श करून येतात. गुरुवाणी दिव्य वाणी असते. गुरुवचन हृदयवीणेचा झंकार असते. त्यामुळे गुरुवाक्याला मंत्राचें सामर्थ्य प्राप्त होते. गुरूचे कोणतेही बोल निरर्थक नसतात. साधकाच्या जीवनाला परम अर्थ आणून देणारे ते असतात. गुरुवचनांची हयगय करूं नये, त्यांवर मनन व त्या आदेशानुसार वर्तन ठेवावे. गुरुवाणी साधकाची तारक, रक्षक असते. मुमुक्षूला तर गुरुकृपा हीच मोक्षाकडे नेणारी एकमेव साधना. गुरुकृपा व मुक्ति दोन नाहीत. गुरुकृपापात्र साधक मोक्षाचाही अधिकारी होतोच. गुरुकृपा म्हणजे कुंडलिनीशक्तिप्राप्ती. कुंडलिनीजागृति गुरुकृपेविना होत नाही. चित्ताने ध्यान कोणाचे करायचे तर गुरुमूर्तीचे, इंद्रियांनी पूजा कशाची करायची तर गुरुचरणांची, मनाने मनन कशाचे करायचे तर गुरुवचन मोक्षप्राप्तीचा उपाय काय तर गुरुकृपा ह्याप्रमाणे एकाच श्लोकांत देहमनबुद्धि वापरून अनेक साधना गुरुभक्तीत कशा केंद्रित होतात ते अति स्पष्टपणे प देण्यांत आले आहे. या श्लोकाचा मंत्राप्रमाणे उपयोग करावा, इतका हा मह आहे.


25 Feb 2019
जनी सर्व सूखी असा कोण आहे।
विचारे गुरुभक्तमना तूंची शोधुनि पाहे ॥
गुरुभक्तमना त्वांचि रे पूर्व संचीत केले।
तया सारिखे भोगणें प्राप्त झालें ॥

जग अपूर्ण, लोक अपूर्ण, मग पूर्ण सुखी तरी कोणी आढळेल का? सुखाची सारी माध्यमे अपूर्ण, अपुरी आहेत. फक्त गुरुच पूर्णता पावलेला. गुरुव्दाराच पूर्ण सुख शांती लाभु शकतात. असा विचार करशील व जगांत पूर्ण सूखी शोधायला जाशील तर हे गुरुभक्त मना तुला गुरुखेरीज पूर्ण सुख निधान कोठेही गवसणार नाहीं हे पक्के समज. पूर्ण सूखाचा शोध घेतांना अखेर तुला हाच बोध होईल. जसे ज्याचें पूर्व कर्म तसे बरे वाईट भोग त्याच्या वाट्यास येतात. कर्माचा हा कायदा अटळ आहे. पण गुरुभक्त मात्र गुरुभक्तीने माफीचे कूळ होऊ शकतो. गुरुकृपेने त्याचे प्रारब्ध बदलू शकते, पुढील जन्मींच्या आयुष्यातील आयुष्य देखील गुरुआज्ञेनें ब्रम्हदेव बहाल करु शकतो. श्रीगुरुचरित्र याला प्रमाण आहे. एवढें गुरुचें महात्म्य असतांना गुरुभक्त मना. गुरुचरण सोडुन तूं कोठेही रमुं नकोस. जात्याच्या खुट्यापासचे दाणे चरडले जात नाहीत. जात्याच्या गुरुभक्ताचें नुकसान करणारी एकही गोष्ट वा व्यको परिस्थित बाहेरच्या जगात नाही हे विसरु नकोस.

--गुरुमुक्तानंद स्तवनेश्वरी आणि गुरुभाक्त्मानस बोधेश्वरी
श्रुति-स्मृती अविज्ञाय..

श्रुतिस्मृति न जाणताही वेदान्ताचा अभ्यास न करणारे पण केवळ गुरुसेवा करणारेही, संन्यासी ह्या संज्ञेला पात्र होतात. पण गुरुकृपाहीन जरी वेदान्ती असला तरी तो केवळ वेषधारी, नामधारीच समजला पाहिजे, तो बोकेसंन्यासीच ठरणार. गुरुकृपा म्हणजे कुंडलिनीजागृति, संन्यासयोगाची किती सोपी युक्ति हा श्लोक सांगत आहे! आजच्या धामधुमीच्या काळी श्रुतिस्मृतिपारंगत व्हायला कोणाला फुरसत आहे? तेवढी ताकदही कोणात आहे? दीर्घायुष्य तरी कितीजणांना लाभते? अशा जीवांना उद्धाराचा, त्यांना पेलणारा मार्ग हा श्लोक सांगत आहे. गुरुसेवा ही केवढी महान आहे! गुरुसेवक केवळ गुरुसेवेने संन्यासयोगी होऊ शकतो. उलट वेदान्ती केवढाही महान आचार्य असो, पण जर त्याचा गुरू ह्या संस्थेवर विश्वास नसेल, गुरुशिष्य परंपरा तो मानीत नसेल, तो गुरुकृपाहीन असेल तर तो संन्यासपदापर्यंत पोहोचू शकत नाही. स्वत:ला संन्यासी म्हणविणारे पण गुरुकृपेस पात्र ठरलेले नसतील तर ते वेषधारी संन्यासीच समजावेत. खरा संन्यासी व बोकेसंन्यासी ह्यातला फरक सामान्य माणसाला कळत नाही व म्हणून वेषधारी संन्यासी गृहस्थी जनांना सतावतात, भेडसावतात व लुबाडतात. पण हा श्लोक खरा संन्यासी कसा ओळखावा ते स्पष्ट करीत आहे. गुरुकृपा झालेला तोच संन्यासी व त्याला दारोदार भीक मागत हिंडावे लागत नाही. गुरुकृपेने त्याला कधीही काही कमी पडत नाही. संन्यासी हा याचक नसतो, भिकारी वा भिक्षेकरी भिक्षूकही नसतो, तो दाता असतो. पूर्वी संन्यासी भिक्षा मागायला पाच घरे जात, ते संसारी जनांचे आशीर्वादाने भले करायला, स्वत:च्या पोटाची खळगी भरायला नव्हे. रामदासांसारखे समर्थ संन्यासी बसल्याजागी हजारोना जेवण देऊन तृप्त करीत. त्यांना हाती झोळी धरण्याची आवश्यकता कशाला पडेल? पण भिक्षा मागण्याचे निमित्त करून संन्यासी लोकसंग्रह, लोकजागृती करीत सत्संगाचे लोण सामान्यजनांपर्यंत पोहोचवीत. संकटांचे निर्दालन करून सुखाचे ध्वज घरोघर उभारण्यासाठी भिक्षावलंबनाचा मार्ग पत्करून संसारी जनांचे रक्षण करीत, संकटमुक्त करीत. पण आजचे संन्यासी भिक्षाच मागतात फक्त, कुंडलिनी दीक्षा देणारे गुरुकृपापात्र नसतील तर भीक मागणारे भिकारी केवळ! वेषधारी संन्याशांना व त्यांच्या कोपाला व शापाला गुरुभक्ताने भिण्याचे कांही कारण नाही. यथाशक्ति आदर करून मार्गाला लावावे. गुरुभक्ताला असे बोकेसंन्यासी काही अपाय करू शकणार नाहीत. त्याचबरोबर गृहस्थालाही चारी आश्रम प्रपंचांत राहून कसे पुरे करता येतात तेही हा श्लोक दाखवून देत आहे. आपल्या पूर्वजांनी शतायुषी भव म्हणून शंभर वर्षांचे टाइमटेबल करून ठेवले आहे. पहिली पंचवीस वर्षे विद्यार्जन, मग पंचवीस वर्षे वैवाहिक जीवन, पुत्रप्राप्तीने पितृऋण फेडणें, नंतर पंचवीस वर्षे वानप्रस्थाश्रम म्हणजे घरीच राहूनही मनाने संसारातून निवृत होऊन शास्त्रांच्या अध्ययन-अध्यापनांत काळ कंठणे व अखेरची पंचवीस वर्षे संन्यासयोग म्हणजे संकल्पांचा न्यास. घरदार न सोडताही, प्रपंचांत राहूनही गुरुसेवकाला केवळ गुरुसेवेने चारी आश्रम पुरे करता येतात. गुरुसेवा म्हणजे गुरूच्या देहाची सेवा नव्हे, तर गुरुउपदेशानुसार साधना करणे ही गुरुसेवाच होय.

--श्रीगुरुगीतार्थेश्वरी (Marathi)
Subject-wise Jnaneshwari

Guru Om PP Tai's Profound Contribution to Sri Jnaneshwari For 20 consecutive years, PP Tai immersed herself in the study and lecturing of Sri Jnaneshwari, a testament to her unwavering dedication. Her lectures on Siddhayogeshwari are deeply rooted in the principles of Jnaneshwari, demonstrating the text's significance in the practice of Siddhayoga. Inspiring Devotees to Embody the Teachings PP Tai encouraged devotees to integrate Sri Jnaneshwari into their daily lives, emphasizing the importance of reading and reflecting on the text. She suggested that sadhaks (spiritual seekers) read at least two verses from Sri Jnaneshwari before bed, allowing them to internalize the teachings and experience their transformative power. A Comprehensive Approach to Studying Jnaneshwari PP Tai provided various guidelines for studying Jnaneshwari, including a subject-wise approach. This methodology enables readers to delve deeper into specific themes and principles, fostering a richer understanding of the text and its application in daily life.

--Subject-wise Jnaneshwari



Official Site of Mahayogi Swami Umanand Saraswati © Shree Gurudev Dhyan Mandir Trust & Shree Kusumeshwari Prakashan    Site Designed By Raminde.in