The only answer to all questions is Guru. The one remedy for all calamities is Guru. -- souvenir, 1979


Latest Articles


जनी सर्व सूखी असा कोण आहे।
विचारे गुरुभक्तमना तूंची शोधुनि पाहे ॥
गुरुभक्तमना त्वांचि रे पूर्व संचीत केले।
तया सारिखे भोगणें प्राप्त झालें ॥

जग अपूर्ण, लोक अपूर्ण, मग पूर्ण सुखी तरी कोणी आढळेल का? सुखाची सारी माध्यमे अपूर्ण, अपुरी आहेत. फक्त गुरुच पूर्णता पावलेला. गुरुव्दाराच पूर्ण सुख शांती लाभु शकतात. असा विचार करशील व जगांत पूर्ण सूखी शोधायला जाशील तर हे गुरुभक्त मना तुला गुरुखेरीज पूर्ण सुख निधान कोठेही गवसणार नाहीं हे पक्के समज. पूर्ण सूखाचा शोध घेतांना अखेर तुला हाच बोध होईल. जसे ज्याचें पूर्व कर्म तसे बरे वाईट भोग त्याच्या वाट्यास येतात. कर्माचा हा कायदा अटळ आहे. पण गुरुभक्त मात्र गुरुभक्तीने माफीचे कूळ होऊ शकतो. गुरुकृपेने त्याचे प्रारब्ध बदलू शकते, पुढील जन्मींच्या आयुष्यातील आयुष्य देखील गुरुआज्ञेनें ब्रम्हदेव बहाल करु शकतो. श्रीगुरुचरित्र याला प्रमाण आहे. एवढें गुरुचें महात्म्य असतांना गुरुभक्त मना. गुरुचरण सोडुन तूं कोठेही रमुं नकोस. जात्याच्या खुट्यापासचे दाणे चरडले जात नाहीत. जात्याच्या गुरुभक्ताचें नुकसान करणारी एकही गोष्ट वा व्यको परिस्थित बाहेरच्या जगात नाही हे विसरु नकोस.

--गुरुमुक्तानंद स्तवनेश्वरी आणि गुरुभाक्त्मानस बोधेश्वरी
श्रुति-स्मृती अविज्ञाय..

श्रुतिस्मृति न जाणताही वेदान्ताचा अभ्यास न करणारे पण केवळ गुरुसेवा करणारेही, संन्यासी ह्या संज्ञेला पात्र होतात. पण गुरुकृपाहीन जरी वेदान्ती असला तरी तो केवळ वेषधारी, नामधारीच समजला पाहिजे, तो बोकेसंन्यासीच ठरणार. गुरुकृपा म्हणजे कुंडलिनीजागृति, संन्यासयोगाची किती सोपी युक्ति हा श्लोक सांगत आहे! आजच्या धामधुमीच्या काळी श्रुतिस्मृतिपारंगत व्हायला कोणाला फुरसत आहे? तेवढी ताकदही कोणात आहे? दीर्घायुष्य तरी कितीजणांना लाभते? अशा जीवांना उद्धाराचा, त्यांना पेलणारा मार्ग हा श्लोक सांगत आहे. गुरुसेवा ही केवढी महान आहे! गुरुसेवक केवळ गुरुसेवेने संन्यासयोगी होऊ शकतो. उलट वेदान्ती केवढाही महान आचार्य असो, पण जर त्याचा गुरू ह्या संस्थेवर विश्वास नसेल, गुरुशिष्य परंपरा तो मानीत नसेल, तो गुरुकृपाहीन असेल तर तो संन्यासपदापर्यंत पोहोचू शकत नाही. स्वत:ला संन्यासी म्हणविणारे पण गुरुकृपेस पात्र ठरलेले नसतील तर ते वेषधारी संन्यासीच समजावेत. खरा संन्यासी व बोकेसंन्यासी ह्यातला फरक सामान्य माणसाला कळत नाही व म्हणून वेषधारी संन्यासी गृहस्थी जनांना सतावतात, भेडसावतात व लुबाडतात. पण हा श्लोक खरा संन्यासी कसा ओळखावा ते स्पष्ट करीत आहे. गुरुकृपा झालेला तोच संन्यासी व त्याला दारोदार भीक मागत हिंडावे लागत नाही. गुरुकृपेने त्याला कधीही काही कमी पडत नाही. संन्यासी हा याचक नसतो, भिकारी वा भिक्षेकरी भिक्षूकही नसतो, तो दाता असतो. पूर्वी संन्यासी भिक्षा मागायला पाच घरे जात, ते संसारी जनांचे आशीर्वादाने भले करायला, स्वत:च्या पोटाची खळगी भरायला नव्हे. रामदासांसारखे समर्थ संन्यासी बसल्याजागी हजारोना जेवण देऊन तृप्त करीत. त्यांना हाती झोळी धरण्याची आवश्यकता कशाला पडेल? पण भिक्षा मागण्याचे निमित्त करून संन्यासी लोकसंग्रह, लोकजागृती करीत सत्संगाचे लोण सामान्यजनांपर्यंत पोहोचवीत. संकटांचे निर्दालन करून सुखाचे ध्वज घरोघर उभारण्यासाठी भिक्षावलंबनाचा मार्ग पत्करून संसारी जनांचे रक्षण करीत, संकटमुक्त करीत. पण आजचे संन्यासी भिक्षाच मागतात फक्त, कुंडलिनी दीक्षा देणारे गुरुकृपापात्र नसतील तर भीक मागणारे भिकारी केवळ! वेषधारी संन्याशांना व त्यांच्या कोपाला व शापाला गुरुभक्ताने भिण्याचे कांही कारण नाही. यथाशक्ति आदर करून मार्गाला लावावे. गुरुभक्ताला असे बोकेसंन्यासी काही अपाय करू शकणार नाहीत. त्याचबरोबर गृहस्थालाही चारी आश्रम प्रपंचांत राहून कसे पुरे करता येतात तेही हा श्लोक दाखवून देत आहे. आपल्या पूर्वजांनी शतायुषी भव म्हणून शंभर वर्षांचे टाइमटेबल करून ठेवले आहे. पहिली पंचवीस वर्षे विद्यार्जन, मग पंचवीस वर्षे वैवाहिक जीवन, पुत्रप्राप्तीने पितृऋण फेडणें, नंतर पंचवीस वर्षे वानप्रस्थाश्रम म्हणजे घरीच राहूनही मनाने संसारातून निवृत होऊन शास्त्रांच्या अध्ययन-अध्यापनांत काळ कंठणे व अखेरची पंचवीस वर्षे संन्यासयोग म्हणजे संकल्पांचा न्यास. घरदार न सोडताही, प्रपंचांत राहूनही गुरुसेवकाला केवळ गुरुसेवेने चारी आश्रम पुरे करता येतात. गुरुसेवा म्हणजे गुरूच्या देहाची सेवा नव्हे, तर गुरुउपदेशानुसार साधना करणे ही गुरुसेवाच होय.

--श्रीगुरुगीतार्थेश्वरी (Marathi)
यत्रैव तिष्ठते सोऽपि, स देशः पुण्यभाजनम् । मुक्तस्य लक्षणं देवि, तवाग्रे कथितं मया ॥

Wherever he may dwell, that place becomes holy O Goddess! Thus I have described to you the characteristic of a liberated one. Shri Guru Geeta leads the one who follows Her honestly, to the Goal of Self-realization, helping him to climb the ladder of sadhana, giving him full description of seeker, sadhana and siddha. Shri Guru Geeta removes all the doubts from the seeker's mind by telling him the characteristics of the liberated one and the effects of self-realization. This stanza is summarizing all the characteristics of a Siddha, that have been so far described In short the dwelling place, abode of Siddha Purusha also equally is full of merit and does good to all. The realize perfect man makes any place where he lives, holy and sacred the place achieves the importance of Purusha-kshetra. So much influence he has over and about the place of his abode. Many miles around his abode, whoever happens to roar about, even his safety is assured, his life and property are protected because of the Siddha's power. It is said that ever if by mistake anybody unconsciously follows the path to Pandharpur, it amounts to meritorious act on his part, in the same way, all those who live near or round about the holy place where the liberated man resides, obtain merit automatically, without doing any deliberate efforts, and they too get liberated sooner or later. This stanza thus tells the greatness of the holy man's residence too. That is why the liberated one never dwells at one place for long, but roams about all over the world, and creates several holy places for people to get liberated. He travels a lot from time to time, from place to place. As the Sun shines from one place and throws his rays all over the world so also the liberated one remains at one place but the whole circumference becomes bright with his divine light and the darkness of ignorance is removed. The place becomes the abode of self. This is the characteristic of Guru-Tattva. This is the Tattva. This is the effect of it.

--Shri Gurugeetartheshwari
Shri Gurucharitra Siddhanteshwari

(२४३) गेला क्षण पुन्हा पकडता येत नाही. गेला दिवस मागुता येत नाही; गत काळात कालवून काल होतो. क्षणाक्षणांनी आयुष्य घरंगळत जात असते. उतरत्या पाटावरच्या मोहऱ्या जशा घरंगळतात, पकडता येत नाहीत. गतायुष्याला बोलावले तरी ते आयुष्य परतणार नाही. आज तो आपला. उद्या अद्याप उगवायचा असतो. काल काळात गडप झालेला असतो. आटोक्यात फक्त चालू काळच असतो. वर्तमानकाळावर ताबा ठेवावा.

(२४४) हाती घेतलेल्या कार्याला शाश्वत तर काळ हा स्थळ व काळ दोन्हींची अनुकूलता लागते. त्यातही तुलनात्मक दृष्टीने स्थळ बदलणारा. जे बदल पात्रते त्याची दखल घ्यावी. देह बदलायला बारा वर्षे लागतात पण मन क्षणोक्षणी बदलत असते. म्हणून साधकाने सर्वप्रथम मनावर ताबा मिळवावा. मन म्हणजे विचारांचा ओघ विचारांवर नियंत्रण ठेवावे. काळ म्हणजे क्षणांचा धावता ओघ. वर्त मानकाळातील एकेका क्षणावर अंमल गाजविणे सोपे असते.

(२४५) सर्व पंचेंद्रिये, कर्मेंद्रियांनी दुसऱ्यांना सुखच लागेल असा वापर करावा. हीच पुण्याची पेरणी. प्रकृती म्हणजे कृतीचा प्रकार हातून सत्कृती झाली तर प्रकृती ठीक राहते. प्रकृती बिघडणे हा कृती बिघडलेली होण्याचा परिणाम.

(२४६) जो स्वार्थी आहे, दुस-याच्या सुखार्थ झटत नाही तो पशु, अनित्य गोष्टींना नित्याच्या गोष्टी समजून उराशी कवटाळतो तोही पशूच. पशूला पाशातून सोडवायला पशुपती गुरुचा शक्तिपातच हवा. नरपशूचा नर झाल्याखेरीज नारायण होता येत नाही.

(२४७) गुरुविषयी साशंक वृत्ती मुक्तीमुक्तीच्या आड येणारच.

(२४८) अध्ययन अध्यापनात काळ घालविणे वानप्रस्थाची खूण. मग जनात असो, गृही असो वा वनात असो. आपण जीवन कसे घालवितो, कोणत्या कार्यात वेळ घालवितो त्यावरून आपला वर्णश्रम कळतो.

(२४९) पुस्तकी ज्ञान कोरडेच. रोकडा अनुभ गुरुच देतो.

(२५०) सत्यरूप गुरुपुढे असत्य, अनित्य टिकूच शकत

(२५१) मम गळलेले, निर्मम झालेले ते शुद्ध अंतःकरण. तेथे सदैव मंगलच घडणार. क्षुद्र अंतःकरण तर अमंगलच होणार. मंगल जीवन मंगळसूत्रावर अवलंबून नाही. मंगल विचारांवर, पवित्र अंतःकरणा-वर आहे.

(२५२) • गुरुकृपेचा विशेष हा की इंद्रियदमन करावे लागत नाही. इंद्रियांना लागते, पडते. मनाची बखवख, हवंहवं, मनःकामनापूर्तीने चासनाक्षयाने मनःशमन साधते. मनाची मुस्कुटदाबी करावी लागत नाही. की बुद्धीची गळचेपी, कुचंबणा नको की देहदंडही नको.

--Shri Gurucharitra Siddhanteshwari
पिंडे मुक्ता पदे मुक्ता
रूपे मुक्ता वरानने

ज्याची कुंडलिनी शक्ति जागृत झाली आहे, ज्याचा हं स: मंत्राक्षरांत प्राण स्थिर झाला आहे व ज्याला आत्मज्योतीचे नील बिंदूंत दर्शन झाले आहे व जो निरंजन, निराकार, निर्विकल्प स्थितीत आहे, तोच मुक्त ह्यांत संशय नाही. कुंडल म्हणजे वेटोळे घालून असलेली साडेतीन वेढे असलेली दिव्य शक्ति. प्रत्येक व्यक्तीत मूलाधारांत पाठीच्या कण्याच्या खाली असते. तिला दोन मुखे असून एक बाहेरच्या जगांत इंद्रियभोगांत प्रवृत्त करते व दुसरे निवृत्त मार्गानि सर्व देह व्याप्त करण्यासाठी, मस्तकापर्यंत पोहोचण्यासाठी ऊर्ध्वगामी होण्यास गुरूच्या साहाय्याची अपेक्षा करून असते. गरुकृपेने साधक प्रवृत्तीचा निवृत्तिदास होतो व ज्ञानमार्गे आत्मसाक्षात्काराच्या मार्गास लागतो. पिंडातून मुक्त झाल्याची खूण म्हणजे कुंडलिनी जागृति. मी देह ही भावना मग जाते. मी तोच, हं स: हा सोऽहम् मंत्रच श्वासोच्छ्वासातून ध्यानांत विवक्षित अवस्थेत ऐकू येतो म्हणून हं सः मंत्राक्षरांत प्राण स्थिर होणे म्हणजे पदमुक्ति. नील बिंदु हेच वास्तविक गुरूचे निवासस्थान, तुरीया अवस्था होय. जागृति, स्वप्न, सुषुप्तीनंतरची चवथी अवस्था सविकल्प समाधि, जींत जग व जगदीश दोन्ही दिसतात. ह्या तुरीया अवस्थेपर्यंत ध्यान पोहोचणे म्हणजे नामरूपाच्या जगतापासून मुक्तता होणे. अशा ध्यानाचा परिपक्व परिणाम म्हणून साधक नंतर निरंजन, निराकार स्थिती प्राप्त करून घेतो; म्हणजे देह, नाम ह्यांच्या वर्चस्वांतून सर्वस्वी सुटतो, उपाधिरहित होतो. त्याच्या सर्व संकल्पांचा नाश होतो. दृष्टीसमोरील सृष्टि अजिबात नाहींशी होते. सर्वत्र प्रकाशाचा अफाट, अपार समुद्र पसरतो. त्यात त्याचे अस्तित्व, भान लोपून बुडून जाते. उन्मनी ध्यानाच्या ह्या निर्विकल्प समाधीपर्यंत साधक जाऊन पोहोचतो. तेथे ना रूप, ना नाम, ना व्यक्ति, ना सृष्टि. फक्त चिती शक्तिचाच विलास चाललेला असतो. असा अनुभव आलेल्यालाच निःसंशय मुक्त म्हणायचे. स्वात्मप्रकाशच सर्वांच्यांत व सर्व विश्वांत अंतर्बाह्य सर्वत्र व्यापून असलेल्याची प्रत्यक्ष अनुभूति म्हणजेच निर्विकल्प समाधि. तुरीया अवस्थेत स्थिर झालेला व्यवहार व दर्शन दोन्ही एकाच वेळी करीत असतो तर उन्मनी अवस्थेची स्थिरता झाल्यावर ती सहज समाधि होऊन हवे तेव्हा व्यवहारासाठी तुरिया अवस्थेत येता येते व केव्हाही निर्विकल्प समाधीत विश्रांतीही घेता येते. समाधि म्हणजे काष्ठवत् देह, निरुपयोगी जीवन नव्हे. तर खरी परिपक्व पूर्ण समाधि म्हणजे पूर्ण समाधानाने सहज जीवन जगणे; प्रकाशांतून सुखाने वाटचाल करणे, अंधारांतले चाचपडत कष्टी जीवन पूर्णतया संपते. सूर्याप्रमाणे सर्व जगावर आत्मप्रकाश पसरवीत, चंद्राप्रमाणे सर्व जीवांना शीतलता देत, मेघाप्रमाणे सर्वांवर प्रेमाची वृष्टि करीत, आनंदाची कुबेरसंपत्ति सर्वत्र लुटत, असा समाधीयुक्त अवघाची संसार सुखाचा करून आनंदाने तिन्ही लोक भरून टाकतो. जीवन्मुक्त होऊन विदेही मुक्ति पण ह्याची देही साधतो.

--श्रीगुरुगीतार्थेश्वरी (Marathi)
ध्यानमूलं गुरोर्मूर्तिः
पूजामूलं गुरोः पदम् ।

ध्यानाचे आधारस्थान गुरुमूर्ति होय. पूजेचे मूलस्थान गुरुचरण, मंत्राचे उगमस्थान गुरुवाक्य, मोक्षाचा मूलाधार गुरूची कृपा होय. साधक आध्यात्मिक मार्गाला लागला की त्याला प्रश्न पडतो, कोणाचे ध्यान करावे, कोणाची पूजा करावी. कोणता मंत्र जपावा व मोक्षापर्यंत कसे जावे. ह्या साऱ्या प्रश्नांची उत्तरे हा एक श्लोक देत आहे. सगुण भक्ति सुलभ व दीर्घकाल साधली की तिची परिणती निर्गुणांत होतेच, त्यांतही गुरूमूर्तीचे ध्यान सर्वांत अति सुलभ. गुरूला व्यक्ति म्हणून आपण पाहिलेले असते, गुरू इंद्रियगोचर असतो, त्यामुळे मनाला गुरुठायी एकचित्त होणे कठीण पडत नाही. पुन्हा गुरू हा देवाधिदेव, महादेव असतो. एका गुरुमूर्तीध्यानांत इतर साऱ्या देवदेवतांची आराधना आपोआपच होते. ध्यान करायचे ते गुरुमूर्तीवरच करावे. गुरुचरणपूजनांत साऱ्या प्रकारच्या पूजा अंतर्भूत होतात. मुळाला पाणी घातले की शाखापल्लव आदि सर्वांना पाणी मिळते, तद्वत् गुरुभक्तीने सर्व प्रकारची साधना आपोआपच होते. वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत. कारण गुरू हेच सर्व साधनांचें मूळ व फळ असतें. गुरू हेच साध्य. गुरू हेच साधनही. साध्य, साधना, साधक ही त्रिपुटी गुरूमध्ये एक होते. अद्वैतापर्यंत जाण्याचा अति जवळचा व लांब नसलेला मार्ग म्हणजे गुरुभक्ति होय, यांत मुळीच संदेह नाही. गुरुवाक्य मंत्रवत् असते. गुरुवचनांवर मनन केल्याने साधकाचा मंत्र, जप झाल्यासारखेच होते. गुरुमुखांतून निघणारे बोल परतत्त्वाला स्पर्श करून येतात. गुरुवाणी दिव्य वाणी असते. गुरुवचन हृदयवीणेचा झंकार असते. त्यामुळे गुरुवाक्याला मंत्राचें सामर्थ्य प्राप्त होते. गुरूचे कोणतेही बोल निरर्थक नसतात. साधकाच्या जीवनाला परम अर्थ आणून देणारे ते असतात. गुरुवचनांची हयगय करूं नये, त्यांवर मनन व त्या आदेशानुसार वर्तन ठेवावे. गुरुवाणी साधकाची तारक, रक्षक असते. मुमुक्षूला तर गुरुकृपा हीच मोक्षाकडे नेणारी एकमेव साधना. गुरुकृपा व मुक्ति दोन नाहीत. गुरुकृपापात्र साधक मोक्षाचाही अधिकारी होतोच. गुरुकृपा म्हणजे कुंडलिनीशक्तिप्राप्ती. कुंडलिनीजागृति गुरुकृपेविना होत नाही. चित्ताने ध्यान कोणाचे करायचे तर गुरुमूर्तीचे, इंद्रियांनी पूजा कशाची करायची तर गुरुचरणांची, मनाने मनन कशाचे करायचे तर गुरुवचन मोक्षप्राप्तीचा उपाय काय तर गुरुकृपा ह्याप्रमाणे एकाच श्लोकांत देहमनबुद्धि वापरून अनेक साधना गुरुभक्तीत कशा केंद्रित होतात ते अति स्पष्टपणे प देण्यांत आले आहे. या श्लोकाचा मंत्राप्रमाणे उपयोग करावा, इतका हा मह आहे.

--श्रीगुरुगीतार्थेश्वरी (Marathi)
माता धन्या पिता धन्यो,
धन्यो वंश: कुलं तथा।
धन्या च वसुधा देवि,
गुरुभक्तिः सुदुर्लभा

हे देवी, गुरुभक्ताची माता, कुळ, वंश व पृथ्वी देखील धन्य होय. पण गुरुभक्ति ही अतिदुर्लभ पण आहे. गुरुभक्तीच्या साधनेचा सोपान सोपा नाही. हा श्लोक गुरुभक्ताचा गौरव करीत आहे. गुरू आहे म्हणजे गुरुभक्त असणारच. गुरुभक्तीने ते तर तरून जातातच, धन्य होतात, पण त्यांची मातापिता, वंश, कुळ ही पण धन्य होतात. पृथ्वी देखील धन्यता पावते. इतका गुरुभक्तीचा व गुरुभक्तांचा महिमा आहे. प्रत्येक घरी गुरुभक्त निर्माण होण्याची आज गरज आहे. गुरुभक्तियोग हाच आजच्या काळाचा योग ठरणार. पण त्याबरोबरच गुरुभक्ति इतकी सुलभ पण नाहीं. गुरुभक्तही मिळणे दुर्लभ. ह्याचे कारण गुरुविषयी अज्ञान. गुरूला व्यक्ति समजल्याने, का म्हणून गुरूला शरण जायचे, गुरू हवाच का, आपल्या आपण साधना केली तर नाहीं का चालणार, प्रत्येकात सद्गुरू असतो त्याचे मार्गदर्शन घ्यावे, हे व अशा प्रकारचे नाना प्रश्न आज चांगले चांगले सुशिक्षित विद्वान म्हणविणारेही उपस्थित करताना पाहून आश्चर्य वाटते. गुरू ही शक्ति आहे. बल्ब्ज, पंखे, हीटर, रेफ्रिजरेटर ह्यांनी पण म्हणावे, पण वीज हवीच कशाला, आमचे आम्हीच कार्य करू की, विजेला शरण गेले पाहिजेच का, हे जसे हास्यास्पद तितकेच पोरकट वक्तव्य गुरू न मानणारे करीत असतात. श्रीगुरुगीता गुरुरहस्य उघड करते. श्रीगुरुगीतेचा पाठ्यपुस्तक, स्वाध्यायग्रंथ म्हणून रीतसर

--श्रीगुरुगीतार्थेश्वरी (Marathi)
महाहंकारगर्भेण,
तपोविद्याबलान्विताः।
संसारकुहरावर्ते,
घटयंत्रे यथा घटाः

तप, विद्या, बल ह्यांनी युक्त असूनही जीवापोटी महान अहंकार, मी देह ही भावना हाडीमासी खिळून राहिल्याने, उराशी कवटाळून धरल्याने, संसाररूपी विहिरीत रहाटगाडग्याच्या घटाप्रमाणे फिरत असतात. मी देह हा भ्रम असल्यामुळे तपस्वी, ज्ञानी, बलशाली व्यक्तीदेखील अहंकाराच्या कर्तृत्वाच्या, मी कर्ता, मी भोक्ता ह्या भावाच्या आहारी गेल्याने स्थिरचित्त नसतात. विहिरीतून पाणी काढण्यास रहाटगाडगे लावलेले असते. ते एकसारखे फिरते ठेवतात. म्हणजे त्यांतील पोहरे विहिरीच्या पाण्यात बुडून पाण्याने भरून वर येतात व विहिरीबाहेरील टाकीत रिकामे होतात व रिकामे असलेले विहिरींतून भरून वर येतात, असे रहाटगाडगे सतत चालू असते. त्याप्रमाणेच संसाररूपी पंचमहाभूतांच्या चक्रांत मी देह ही भावना दृढ असलेले अज्ञानी जीव, मग ते कितीही तप केलेले असोत वा बलवान असोत, सांपडतात. व्यवहारांत अहंकार म्हणजे गर्व, दर्प, अभिमान असा अर्थ समजतात. जे आपल्याजवळ असेल त्याचा अभिमान बाळगून दुसऱ्याला तुच्छ लेखणे म्हणजे गर्व व गर्वाचे घर खालीच होणार. पण आध्यात्मिकदृष्ट्या अहंकार म्हणजे देहाशी तादात्म्य पावणे, मी म्हणजे देह ही भावना पोटी धरून त्या भ्रमाने जीवन कंठणे होय. हे अज्ञान, हा भ्रम जोवर मूळ धरून आहे तोवर वरून वरून कितीही तप झाले, ज्ञान मिळविले वा बल संपादिले तरी काही उपयोग नाही. रोपाच्या डिक्शा वरून खुडून चालत नाही, मूळच उपटावे लागते. मी देह हा अंहकार गेला, मी आत्मा हा बोध झाला व तसा ध्यानाच्या वेळी अनुभव आला म्हणजेच अहंकाराचा समूळ नाश होतो. मग विद्या, तप, बल ही साधने ठरतात. व्यर्थ होत नाहीत. जन्ममृत्यूच्या चक्रांत सापडावे लागत नाही; व जीव मुक्त होऊन आत्मीयतेने, निरहंकाराने जीवन जगतो. नि:स्वार्थी होतो.

--श्रीगुरुगीतार्थेश्वरी (Marathi)



Official Site of Mahayogi Swami Umanand Saraswati © Shree Gurudev Dhyan Mandir Trust & Shree Kusumeshwari Prakashan    Site Designed By Raminde.in