The Spiritual Reformer


The path of Guru-Bhakti-Yoga established by Swami Umanand is only for those who surrender to the Guru and have desire for spiritual progress through Devotion (Bhakti) and Knowledge (Jnani Bhakti). Hence the path is not for those who aim for only worldly fulfillments. Instead of that, Swami taught devotees to progress in spiritual life (Paramarth) through worldly life (Prapanch).


Upcoming Events





In words of Gurudev




Articles

जनी सर्व सूखी असा कोण आहे।
विचारे गुरुभक्तमना तूंची शोधुनि पाहे ॥
गुरुभक्तमना त्वांचि रे पूर्व संचीत केले।
तया सारिखे भोगणें प्राप्त झालें ॥

जग अपूर्ण, लोक अपूर्ण, मग पूर्ण सुखी तरी कोणी आढळेल का? सुखाची सारी माध्यमे अपूर्ण, अपुरी आहेत. फक्त गुरुच पूर्णता पावलेला. गुरुव्दाराच पूर्ण सुख शांती लाभु शकतात. असा विचार करशील व जगांत पूर्ण सूखी शोधायला जाशील तर हे गुरुभक्त मना तुला गुरुखेरीज पूर्ण सुख निधान कोठेही गवसणार नाहीं हे पक्के समज. पूर्ण सूखाचा शोध घेतांना अखेर तुला हाच बोध होईल. जसे ज्याचें पूर्व कर्म तसे बरे वाईट भोग त्याच्या वाट्यास येतात. कर्माचा हा कायदा अटळ आहे. पण गुरुभक्त मात्र गुरुभक्तीने माफीचे कूळ होऊ शकतो. गुरुकृपेने त्याचे प्रारब्ध बदलू शकते, पुढील जन्मींच्या आयुष्यातील आयुष्य देखील गुरुआज्ञेनें ब्रम्हदेव बहाल करु शकतो. श्रीगुरुचरित्र याला प्रमाण आहे. एवढें गुरुचें महात्म्य असतांना गुरुभक्त मना. गुरुचरण सोडुन तूं कोठेही रमुं नकोस. जात्याच्या खुट्यापासचे दाणे चरडले जात नाहीत. जात्याच्या गुरुभक्ताचें नुकसान करणारी एकही गोष्ट वा व्यको परिस्थित बाहेरच्या जगात नाही हे विसरु नकोस.

--गुरुमुक्तानंद स्तवनेश्वरी आणि गुरुभाक्त्मानस बोधेश्वरी
जनी सर्व सूखी असा कोण आहे।
विचारे गुरुभक्तमना तूंची शोधुनि पाहे ॥
गुरुभक्तमना त्वांचि रे पूर्व संचीत केले।
तया सारिखे भोगणें प्राप्त झालें ॥

जग अपूर्ण, लोक अपूर्ण, मग पूर्ण सुखी तरी कोणी आढळेल का? सुखाची सारी माध्यमे अपूर्ण, अपुरी आहेत. फक्त गुरुच पूर्णता पावलेला. गुरुव्दाराच पूर्ण सुख शांती लाभु शकतात. असा विचार करशील व जगांत पूर्ण सूखी शोधायला जाशील तर हे गुरुभक्त मना तुला गुरुखेरीज पूर्ण सुख निधान कोठेही गवसणार नाहीं हे पक्के समज. पूर्ण सूखाचा शोध घेतांना अखेर तुला हाच बोध होईल. जसे ज्याचें पूर्व कर्म तसे बरे वाईट भोग त्याच्या वाट्यास येतात. कर्माचा हा कायदा अटळ आहे. पण गुरुभक्त मात्र गुरुभक्तीने माफीचे कूळ होऊ शकतो. गुरुकृपेने त्याचे प्रारब्ध बदलू शकते, पुढील जन्मींच्या आयुष्यातील आयुष्य देखील गुरुआज्ञेनें ब्रम्हदेव बहाल करु शकतो. श्रीगुरुचरित्र याला प्रमाण आहे. एवढें गुरुचें महात्म्य असतांना गुरुभक्त मना. गुरुचरण सोडुन तूं कोठेही रमुं नकोस. जात्याच्या खुट्यापासचे दाणे चरडले जात नाहीत. जात्याच्या गुरुभक्ताचें नुकसान करणारी एकही गोष्ट वा व्यको परिस्थित बाहेरच्या जगात नाही हे विसरु नकोस.

--गुरुमुक्तानंद स्तवनेश्वरी आणि गुरुभाक्त्मानस बोधेश्वरी
श्रुति-स्मृती अविज्ञाय..

श्रुतिस्मृति न जाणताही वेदान्ताचा अभ्यास न करणारे पण केवळ गुरुसेवा करणारेही, संन्यासी ह्या संज्ञेला पात्र होतात. पण गुरुकृपाहीन जरी वेदान्ती असला तरी तो केवळ वेषधारी, नामधारीच समजला पाहिजे, तो बोकेसंन्यासीच ठरणार. गुरुकृपा म्हणजे कुंडलिनीजागृति, संन्यासयोगाची किती सोपी युक्ति हा श्लोक सांगत आहे! आजच्या धामधुमीच्या काळी श्रुतिस्मृतिपारंगत व्हायला कोणाला फुरसत आहे? तेवढी ताकदही कोणात आहे? दीर्घायुष्य तरी कितीजणांना लाभते? अशा जीवांना उद्धाराचा, त्यांना पेलणारा मार्ग हा श्लोक सांगत आहे. गुरुसेवा ही केवढी महान आहे! गुरुसेवक केवळ गुरुसेवेने संन्यासयोगी होऊ शकतो. उलट वेदान्ती केवढाही महान आचार्य असो, पण जर त्याचा गुरू ह्या संस्थेवर विश्वास नसेल, गुरुशिष्य परंपरा तो मानीत नसेल, तो गुरुकृपाहीन असेल तर तो संन्यासपदापर्यंत पोहोचू शकत नाही. स्वत:ला संन्यासी म्हणविणारे पण गुरुकृपेस पात्र ठरलेले नसतील तर ते वेषधारी संन्यासीच समजावेत. खरा संन्यासी व बोकेसंन्यासी ह्यातला फरक सामान्य माणसाला कळत नाही व म्हणून वेषधारी संन्यासी गृहस्थी जनांना सतावतात, भेडसावतात व लुबाडतात. पण हा श्लोक खरा संन्यासी कसा ओळखावा ते स्पष्ट करीत आहे. गुरुकृपा झालेला तोच संन्यासी व त्याला दारोदार भीक मागत हिंडावे लागत नाही. गुरुकृपेने त्याला कधीही काही कमी पडत नाही. संन्यासी हा याचक नसतो, भिकारी वा भिक्षेकरी भिक्षूकही नसतो, तो दाता असतो. पूर्वी संन्यासी भिक्षा मागायला पाच घरे जात, ते संसारी जनांचे आशीर्वादाने भले करायला, स्वत:च्या पोटाची खळगी भरायला नव्हे. रामदासांसारखे समर्थ संन्यासी बसल्याजागी हजारोना जेवण देऊन तृप्त करीत. त्यांना हाती झोळी धरण्याची आवश्यकता कशाला पडेल? पण भिक्षा मागण्याचे निमित्त करून संन्यासी लोकसंग्रह, लोकजागृती करीत सत्संगाचे लोण सामान्यजनांपर्यंत पोहोचवीत. संकटांचे निर्दालन करून सुखाचे ध्वज घरोघर उभारण्यासाठी भिक्षावलंबनाचा मार्ग पत्करून संसारी जनांचे रक्षण करीत, संकटमुक्त करीत. पण आजचे संन्यासी भिक्षाच मागतात फक्त, कुंडलिनी दीक्षा देणारे गुरुकृपापात्र नसतील तर भीक मागणारे भिकारी केवळ! वेषधारी संन्याशांना व त्यांच्या कोपाला व शापाला गुरुभक्ताने भिण्याचे कांही कारण नाही. यथाशक्ति आदर करून मार्गाला लावावे. गुरुभक्ताला असे बोकेसंन्यासी काही अपाय करू शकणार नाहीत. त्याचबरोबर गृहस्थालाही चारी आश्रम प्रपंचांत राहून कसे पुरे करता येतात तेही हा श्लोक दाखवून देत आहे. आपल्या पूर्वजांनी शतायुषी भव म्हणून शंभर वर्षांचे टाइमटेबल करून ठेवले आहे. पहिली पंचवीस वर्षे विद्यार्जन, मग पंचवीस वर्षे वैवाहिक जीवन, पुत्रप्राप्तीने पितृऋण फेडणें, नंतर पंचवीस वर्षे वानप्रस्थाश्रम म्हणजे घरीच राहूनही मनाने संसारातून निवृत होऊन शास्त्रांच्या अध्ययन-अध्यापनांत काळ कंठणे व अखेरची पंचवीस वर्षे संन्यासयोग म्हणजे संकल्पांचा न्यास. घरदार न सोडताही, प्रपंचांत राहूनही गुरुसेवकाला केवळ गुरुसेवेने चारी आश्रम पुरे करता येतात. गुरुसेवा म्हणजे गुरूच्या देहाची सेवा नव्हे, तर गुरुउपदेशानुसार साधना करणे ही गुरुसेवाच होय.

--श्रीगुरुगीतार्थेश्वरी (Marathi)

Audio Gallery




Jnaneshwari

(Sample) - 5/Chapter 18 - Satva, Raja, Tamas

08 Dec 2023



Wageshwari Bhaktiyog

No. 38 (Sample)
जप तपाचे महत्व

24 Feb 2019



Vaicharik Kranti

(Sample) 398

08 Dec 2023



Siddhayogeshwari

(Sample) E - 379 (19)

08 Dec 2023

Books Archive

Mahayogi Swami Umanand Saraswati, a great spiritual author and poetess, has written a number of books in order to express or share Swami's spiritual experience and thereby providing a source or a medium for the devotees to inculcate the immense knowledge of Spirituality, Sadhana, wisdom and many other things.

Photo Archives


Some Rare Collection of Photos

Q & A


Compilation of Question and Answers

Video Archives


Videos gallery
ध्यानमूलम् गुरोःमूर्तिः पूजा मूलं गुरोः पदम् मंत्रमूलम् गुरोः वाक्यं मोक्षमूलं गुरोः कृपा




Official Site of Mahayogi Swami Umanand Saraswati © Shree Gurudev Dhyan Mandir Trust & Shree Kusumeshwari Prakashan    Site Designed By Raminde.in